सोमवार, ऑक्टोबर १९, २००९

सहज विचार





सणांचा आणि हवामानाचा जवळचा सम्बन्ध। म्हणुन लहानपणी आम्ही आरोळ्या ठोकायचो - "होळी जळाली, थंडी पळाली।" आणि ह्या थंडीची चाहुल लागायची दिवाळीला। दसर्याला रावण जळाला की दिवाळीचे वेध. तयारिची सुरुवात किल्ले बांधण्यापासून। कुठून कुठून गोळा केलेली माती, दगड, विटा, त्यांचा रचलेला डोंगर, त्यावर पेरायचे गहू; बांधायचे बुरुज; तयार करायच्या डोंगर वाटा। हवा कोरडी होत चाललेली, २-२ तास मातीत खेळ मग हात पाय फुटायला लागायचे. पण किल्ला तयार झाल्याशिवाय हे जाणवत नसे। हवेतला गारवा जाणवायचा तो अभ्यंगस्नान ह्या दुष्ट प्रकारासाठी पहाटे उठावे लागायचे त्या वेळी। उबदार पांघरुणातून बाहेर निघायला त्या नरकासुराची भीती घातली जायची। पण तेल मालिश, सुगंधी उटने आणि "पहिल्यांदा मी मोती साबण लावणार" ह्या अभिमानापोटी उठण्यासाठी स्पर्धा लागायची। गरम पाण्याचे पाहिले ताम्बे अंगावर पडले की कृतकृत्य जह्लायासराखे वाटे। ह्या सार्याची आठवण व्हायचे कारण यंदा अभ्यंगस्नान झाले ते थंड पाण्याने अन पहिला फराळ झाला पंखा लावून। घाम पुसत शुभेच्छा दिल्या, घेतल्या। पुन: पुन: deoderent चे फव्वारे मारत राहिलो। ग्लोबल वार्मिंग तुझे सलाम। ह्या नव्या नरकासुराने पाय रोवयाला सुरुवात केलेली आहे। त्याचा संहार करायला आपण मनापासून तयार झालो आहोतका? राजकारण, अर्थकारण ह्यांना स्वार्थकारणातुन बाहेर काढून समाजकारणासाठी लावणारे नेते आता तांतडीने पुढे आणायला हवेत। अन्यथा आमची पोरेबाळे आम्हाला माफ करणार नाहीत आणि माफीचे साक्षीदार व्हायला आम्ही जिवंतही असणार नाही. हे आव्हान स्विकारायला ज्याने त्याने स्वत:लाच आवाहन करायला हवे।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा